'से नो टू अमिताभ बच्‍चन' हायकमांडचे मुख्‍यमंत्र्यांना फर्मान

Posted on Friday, March 26, 2010 by maaybhumi desk

मुंबई

वांद्रे-वरळी सी-लिंकच्‍या उदघाटन समारंभात महानायक अमिताभ बच्चन यांना आमंत्रित केल्‍यावरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्‍यावर पक्षांतर्गत विरोधकांनी अखेर डाव साधला असून यापुढे अमिताभ यांच्‍या सोबत कुठल्‍याही कार्यक्रमाच्‍या व्‍यासपीठावर न जाण्‍याचे फर्मान चव्‍हाण यांना हायकमांडने बजावले आहे.

पुणे येथे सुरू असलेल्‍या मराठी साहित्य संमेलनाच्‍या समारोपास मुख्‍यमंत्री चव्हाण आणि अमिताभ बच्‍चन दोघांनाही आमंत्रित करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सी लिंकच्‍या घटनेनंतर मुख्‍यमंत्री या कार्यक्रमास येतात की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली होता. ती हायकमांडच्‍या आदेशानंतर शमली असली तरीही मुख्‍यमंत्री या कार्यक्रमास आले नाहीत. तर साहित्य संमेलन आयोजकांचा त्यामुळे हीरमोड होणार आहे.


संमेलनाच्‍या समारोपासाठी अमिताभ यांना प्रमुख पाहुणे म्हणून खास आमंत्रित करण्‍यात आले आहे. त्यासाठी संमेलन आयोजकांनी दोन-तीन महिने आधीपासून प्रयत्न केले होते. तर अमिताभ यांनीही हे निमंत्रण आनंदाने स्‍वीकारले आहे. आता अमिताभ किंवा मुख्‍यमंत्री चव्‍हाण यापैकी कुणाला तरी एकाला या कार्यक्रमासाठी येता येणार नाही. त्यामुळे संयोजकांची मोठी गोची होणार आहे. 

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'से नो टू अमिताभ बच्‍चन' हायकमांडचे मुख्‍यमंत्र्यांना फर्मान"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner