विदर्भात महिन्याभरात 30 शेतक-यांच्या आत्महत्या
Posted on Sunday, April 04, 2010 by maaybhumi desk
विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटना सुरूच असून गेल्या महिनाभराच्या काळात यवतमाळ जिल्ह्यातच 30 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या या आकडेवारीनुसार राज्यात शेतक-यांच्या आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.
राज्यात शेतक-यांच्या आत्महत्यांचे हे प्रमाण आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील एकूण आत्महत्यांच्या प्रमाणा इतके आहे.