साहित्य ऋषी विंदांचे निधन
Posted on Sunday, March 14, 2010 by maaybhumi desk
मुंबई
हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय,
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय.
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शीव !
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्वास.
विसर यांना दाब कढ;
माझ्या मना बन दगड !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय,
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय.
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शीव !
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्वास.
विसर यांना दाब कढ;
माझ्या मना बन दगड !


विंदांनी नुसत्याच कविता लिहिल्या नाहीत तर आपल्या जीवनात त्याचा आनंदही घेतल्याचे मत प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या कवितांचा कॅन्व्हॉस खूपच व्यापक असल्याची प्रतिक्रियाही म्हात्रे यांनी दिली आहे.
विंदांना केवळ मराठी कवी म्हणणे चुकीचे असून, ते जागतिक पातळीवरील मोठे कवी होते अशी प्रतिक्रिया 2008 मधील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध हिंदी कवी कुंवर नारायण यांनी दिली आहे.
विंदांच्या लेखनात नावीन्य होते. त्यांनी केवळ गंभीर लिखाणंच केले नाही तर लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या कविताही प्रसिद्ध झाल्याचे ते म्हणाले. विंदांच्या निधनाने मराठी साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे मत ज्येष्ठ कवी चंद्रकांत देवताळे यांनी व्यक्त केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "साहित्य ऋषी विंदांचे निधन"
Post a Comment